Tuesday, 11 September 2012


कितीही जरी असलो आम्ही लोचट ...
भावना आमच्या नाहीयेत बऱ बोथट 

शेतकरी मेला तर त्याचे काय एवढे
आम्ही खाऊ मस्त बर्फी अन पेढे 

आले आले वाढदिवस लावू मस्त मोठे फ्लेक्स 
जाऊ कुठेतरी,मस्त पार्टी करू रीलेक्स 

कुपोषित मेली मुले तर त्याचे काय एवढे 
 आम्ही खाऊ मस्त बर्फी अन पेढे 

परवा कुणी चित्रकाराने आम्हाला नागवे केले 
पेटून उठले ना भौ आमचे सारे चेले 

खरे देशद्रोही आम्हाला पोसायचे असतात 
खरे बोलणारे मात्र अवती भवती नको असतात 

कलाकारालाच चक्क राजद्रोही ठरवले 
भ्रष्टाचारीच सगळे देशभक्त बनले 

आदर्श कोळशाने आमचे थोबाड काळे झाले 
झाले  तर झाले त्यात काय एवढे 
आम्ही खातच राहू मस्त बर्फी आणि पेढे 

Tuesday, 21 August 2012

साधारण २  महिन्यापूर्वी ------- "आग.......... आग........" ,' अरे काय झालं??'  "काही नाही रे जरा तालीम चालू आहे आपत्ती आलीच आज उद्या तर आपण रेडी पाहिजे ना पळायला"...... बरोबर रे बाबा !!!!! कधी काय होईल या राज्यात काही नेम नाही रे ....... आतापर्यंत  पाहतोयस ना  २६/७ ला पाण्याने बुडवलं ............ २६/११ ला अतिरेक्यांनी उडवलं .......... आणि मध्ये मध्ये काही किरकोळ गोष्टी चालूच असतात ..... म्हणजे ह्यांना अतिरेक्यांना पोसता येत पण राज्यातला दुष्काळ घालवता येत नाही ...... एक अतिरेकी मारला गेला म्हणे तुरुंगात तर पोलीस  अधिकारी  निलंबित होतो ..... पण जनतेला चांगलं वाटावं म्हणून अतिरेक्यांना फाशी देता येत नाही ............   

  २ महिन्यानंतर --------     " आग आग " अर्रे बाप रे खरंच आग लागली की राव आज मंत्रालयाला .... बर झालं साहेबांनी आधीच सराव करूब घेतला होता म्हणून नाहीतर आज काही खंर नव्हत ..... साहेबांना मानायला हव काय "दूरदृष्टी" आहे!!!! खरंच असे साहेब आहेत म्हणूनच राज्य चाललंय आज नाहीतर काय माहित काय झालं असत ....... आता मस्त पैकी सुट्टी एन्जॉय करूया बरेच दिवस मनात होत एखादी परदेशवारी करून यावी आयती संधीच मिळाली आता ...... मंत्रालय दुरुस्तीचं टेंडर काढू मस्त आणि मारून येऊ एक ट्रीप ......

अजून किती दिवस असे नालायक राज्यकर्ते आपण निवडून देणार आहोत ..... जो मुख्यमंत्री स्वतःच ऑफिस नाही वाचवू शकलेला तो राज्याची जबाबदारी काय सांभाळणार ???? पण आपण चार दिवस हा विषय चावणार अगदी चवीने आणि नंतर विसरून जाणार ...... परत हेच लोक आपलं रक्त पिणार अर्रे प्लीज हे आता तरी थांबवा ..........
महागाईचा पूर आहे , पाउस अजून दूर आहे 
दुष्काळाच्या राज्यामध्ये स्फोटांचा सूर आहे
आपलं सोडून कित्येकांचं आयुष्य का सजेत चाललंय???
सारं कसं मजेत चाललंय ......

भ्रष्टाचाराचा फास आहे, त्याला घोटाळ्याचा वास आहे 
राजकारण्यांच्या डोक्याला उगीच अण्णांचा त्रास आहे 
आपलं सोडून कित्येकांचं आयुष्य का सजेत चाललंय???
सारं कसं मजेत चाललंय ......

लवासा इज व्हेरी कूल,आदर्शची पडली भूल
नवे काहीतरी करणार म्हणजे घोटाळ्याची ती चाहूल
कुठेतरी काहीतरी गणित हे चुकत चाललंय
सारं कसं मजेत चाललंय ......

दुष्काळाच्या राज्यामध्ये आज कुणी हसत नाही,
"आमच्याकडे पाणी आहे आमच काही बिनसत नाही"

महाराजांच्या राज्यात शेतकऱ्याच्या गळ्याला फास आहे
तरुणाईची मात्र चंगळवादाकडे आस आहे
कोडगेपणाच्या दलदलीत सारं कसं फसत चाललंय
आणि तरीही सारं कसं मजेत चाललंय ........

पेट्रोलच्या भावाचा सतत वर खाली पारा
दरवाढीचा सुटलाय सोसाट्याचा वारा
सामान्य माणसाच्या छातीत धस्स होत चाललंय
आणि जगणं मात्र कॉल प्रमाणे मिस होत चाललंय

आणि तरीही सारं कसं मजेत चाललंय ............Swapnil Kunte....