प्रतिभेच्या सरितेला पूर आला थोडा,
अन कृष्ण-मेघासवे धावला वरुणाचा काळा घोडा
कधी टप-टप कधी रिप-रिप कधी रिम-झिम
झाले मन माझे ओले चिम....................
देहास जाई स्पर्शून जेव्हा सोसाट्याचा वारा
आठवे स्पर्श प्रियेचा उठे सर्वांगी शहारा
शहारलेले अंग आणि मनी असे हूर हूर
नकळत हरवून जाताना त्यात, मी जातो माझ्यापासून दूर
का कळे ना याच वेळी एकांत हा मजला छळे
साथ सोबत ना कुणाची अन भास हा मज पुढे पळे
चिंब भिजतो मी म्हणूनी नेहमीच खातो ओरडा
हासतेस तू इथे अन पाउस होतो कोरडा ....................
No comments:
Post a Comment